ब्रेकिंग ! वीज ग्राहकांना मोठा दिलासा, राज्यभर वीजदर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय; पहिल्या वर्षी १० टक्के, पाच वर्षांत २६ टक्के दरकपात

ब्रेकिंग ! वीज ग्राहकांना मोठा दिलासा, राज्यभर वीजदर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय; पहिल्या वर्षी १० टक्के, पाच वर्षांत २६ टक्के दरकपात

मुंबई / कृषी वार्ता न्यूज: महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच महागड्या वीज बिलांपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने वीज दरात कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. येत्या पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वीज दरात तब्बल २६ टक्के कपात होणार आहे. यातील पहिल्या वर्षीच १० टक्के दरकपात लागू होईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माहिती देत हा निर्णय जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच वीज दर कमी करण्यासाठी महावितरणने याचिका दाखल केली होती. यापूर्वी बहुतांश वेळा वीज दरवाढीच्या याचिका सादर होत असत, पण यावेळी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महावितरणच्या वीज दरकपातीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयाबद्दल फडणवीस यांनी आयोगाचे आभार मानले आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्यवेळी, दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हा निर्णय घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना लागू होणार आहे. विशेषतः राज्यातील सुमारे ७० टक्के ग्राहक, जे दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात, त्यांना या कपातीचा सर्वाधिक फायदा होईल. या ग्राहकांना पहिल्या वर्षी १० टक्के दरकपात मिळेल, ज्यामुळे त्यांचे वीज बिल लक्षणीयरीत्या कमी होईल.

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० युद्धपातळीवर राबवली जात आहे. याशिवाय, आगामी काळात वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेवर अधिक भर दिला जाणार आहे. यामुळे वीज खरेदीचा खर्च कमी होईल आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळेल. या उपाययोजनांमुळे महावितरणला वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव मांडता आला.

PM Pik Vima Yojana: 1 रुपयात पिक विमा योजना बंद पहा खरीप हंगामासाठी नवीन दर किती आहेत? अर्जासाठी 31 जुलैपर्यंत मुदत

हा निर्णय जाहीर करताना फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, ही बातमी राज्यातील जनतेला सांगताना त्यांना खूप समाधान वाटत आहे. यापूर्वीच्या काळात वीज दरवाढीच्या याचिका सादर होणे ही सामान्य बाब होती, परंतु प्रथमच वीज दरकपातीचा प्रस्ताव मांडून तो मंजूर करवून घेण्यात महावितरण आणि राज्य सरकारला यश आले आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना, उद्योजकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना याचा तात्काळ फायदा होईल. तसेच, हरित ऊर्जेचा वाढता वापर आणि वीज खरेदी खर्चातील बचत यामुळे भविष्यातही वीज दर कमी ठेवण्यास मदत होईल.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “ब्रेकिंग ! वीज ग्राहकांना मोठा दिलासा, राज्यभर वीजदर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय; पहिल्या वर्षी १० टक्के, पाच वर्षांत २६ टक्के दरकपात”

Leave a Comment

WhatsApp Join Group!